विजयादशमी
आला आला दसरा
वाईट विचार विसरा
सद्गुण, सदविचार
आत्मसात करा ||
विजयाचा उत्सव म्हणून दसरा सण साजरा केला जातो . दसरा हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त आहे .आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून देवीचे नवरात्र साजरे केले जाते. त्यानंतर दहाव्या दिवशी म्हणजे दशमीच्या दिवशी विजय उत्सव साजरा केला जातो म्हणून या दिवसाला विजयादशमी असे म्हटले जाते .
या दिवशी देवीने महिषासुर नावाच्या राक्षसाला ठार केले तसेच प्रभू रामचंद्रांनी या दिवशी रावणाचा वध केला . राक्षसी वृत्तींना नष्ट केले म्हणून दसरा हा सण साजरा केला जातो.पण आजही आपल्याला मानवात राक्षसी वृत्ती आढळून येते.
दसर्याच्या दिवशी शस्त्रपूजन केल्या जाते . तसेच या दिवशी दाराला तोरण बांधतात अंगणात रांगोळी काढतात .उत्सवाचा , आनंदाचा सण म्हणून दसरा साजरा केला जातो .
या दिवशी सोन्या चांदीचे दागिने खरेदी केले जाते .आपट्याची पाने सोने म्हणून वाटली जातात . यामुळे मानवाच्या मनात प्रीती जपली जाते .या दिवशी घरात गोड-धोड केले जाते.या दिवशी पांडवांनी अज्ञातवासात असताना शक्तीपूजन करून शस्त्रांची पूजा केली .
तसेच बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धर्माचा स्वीकार दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर केला होता आणि आपल्या अनुयायांना बुद्ध धर्माची दीक्षा दिली. एकूणच दुष्ट प्रवृत्तीचे दहन करून चांगल्या गुणांचे संवर्धन केल्या जावे ही विजयादशमी साजरा करण्यामागचे कारण आहे .
आनंदाचा उत्साहाचा नवचैतन्याचा दिवस म्हणून दसरा सण साजरा केला जातो.
विजयादशमी
दसरा हा सण
शुभ मुहूर्ताचा,
हिंदू संस्कृतीत
विजयोत्सवाचा.
विजयादशमी
शस्त्राचे पुजन,
अनेक ठिकाणी
रावण दहन.
दुर्गेने मारिले
महिषासुराला,
स्वतः रक्षणाचा
विडा उचलला.
असत्यावरती
सत्याचा विजय,
अधर्मावरती
धर्माचा विजय.
आपट्याची पाने
एकमेकां देती,
दुर्गां भवानीचे
पूजन करती
चैतन्याचे वारे
वाहती मनात,
सुख समाधान
लाभे जीवनात.
No comments:
Post a Comment