Monday, October 2, 2023

शांतीदूत बापू गांधी - Poem on Mahatma Gandhi

 शांतीदूत बापू गांधी




सत्य, अहिंसा, शांतीची 

शिकवण ही  जगाला.

थोर महात्मा गांधींनी

मुक्त केले भारताला.


 शांतीदूत बापू गांधी

 त्यांची साधीच राहणी, 

 स्वावलंबी  आचरण 

 उच्च  विचारसरणी.


 पायी काढी दांडी यात्रा 

 मिठासाठी  सत्याग्रह, 

 पारतंत्र  नष्ट  व्हावे 

 गांधीजीचा हा आग्रह.


 शस्त्र, अस्त्र ना हातात

 लढे ते  स्वातंत्र्यासाठी, 

 इंग्रजांच्या  विरोधात

 दिला  नारा देशासाठी.


 स्वयंपूर्ण गाव व्हावे

 संकल्पना ही बापूंची,

 आज गरज  देशाला 

 गांधीजींच्या  विचारांची.

No comments:

Post a Comment

गणेशाचे आगमन - मराठी कविता

  गणेशाचे आगमन   भाद्रपद  चतुर्थीला  गणेशाचे  आगमन, सर्वांरंभी  पूजोनीया  करू स्वागत वंदन.  महादेव  पार्वतीचा  सुकुमार  गणपती,  स्वामी चौसष्...