शांतीदूत बापू गांधी
सत्य, अहिंसा, शांतीची
शिकवण ही जगाला.
थोर महात्मा गांधींनी
मुक्त केले भारताला.
शांतीदूत बापू गांधी
त्यांची साधीच राहणी,
स्वावलंबी आचरण
उच्च विचारसरणी.
पायी काढी दांडी यात्रा
मिठासाठी सत्याग्रह,
पारतंत्र नष्ट व्हावे
गांधीजीचा हा आग्रह.
शस्त्र, अस्त्र ना हातात
लढे ते स्वातंत्र्यासाठी,
इंग्रजांच्या विरोधात
दिला नारा देशासाठी.
स्वयंपूर्ण गाव व्हावे
संकल्पना ही बापूंची,
आज गरज देशाला
गांधीजींच्या विचारांची.
No comments:
Post a Comment